मे २०२६ पर्यंत संपूर्ण नक्षलवादाचा खात्मा
मे २०२६ पर्यंत संपूर्ण नक्षलवादाचा खात्मा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : गडचिरोली येथील नक्षलवाद जवळपास संपला असून, मे २०२६ पर्यंत संपूर्ण नक्षलवादाचा खात्मा केला जाणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आता नक्षलवादाचे कंबरडे मोडले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासीयांना आणि मलाही अभिमान असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
नक्षलवादाविरोधात ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट केंद्र सरकारने हाती घेतले आहे. याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा तसेच सशस्त्र पोलिस दलाचे अभिनंदन करतो, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार आल्यावर नक्षलवाद्यांवर ही कारवाई झाली, आता दररोज नक्षलवादी मारले जात आहेत. कणखर गृहमंत्री अमित शहा हे नक्षलवाद्यांना ठेचल्याशिवाय राहणार नसल्याचेदेखील त्यांनी या वेळी सांगितले.
-------------------------
पाकिस्तानविरोधात कारवाईचा धडाका
पहलगाममध्ये आपल्या बहिणींचे सिंदूर पुसण्याचे पाप अतिरेक्यांनी केले, पण त्याला जशास तसे उत्तर आणि धडा शिकवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पाकिस्तान भारतावर हल्ले केल्यावर या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यापासून पाकिस्तानविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.