कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ६८ जणांची माघार
कल्याण, ता. १८ ( वार्ताहर) : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २९ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ७२ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, कागदपत्रे अपुरी असल्याचे कारण देत अर्ज बाद केलेल्या एका उमेदवाराला न्यायालयाने निवडणूक लढविण्याची परवानगी दिल्याची चर्चा आहे. न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्याखेरीज अंतिम यादी प्रसिद्ध करता येत नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधवर यांनी सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी १५६ उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील १६ अर्ज बाद झाले होते. अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केल्याने ९९ उमेदवारांचे १४० अर्ज होते. मंगळवारी (ता. १७) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी ६८ अर्ज माघारी घेण्यात आल्याने ७२ उमेदवार रिंगणात आहेत. याच वेळी कागदपत्रे अपुरी असल्याचे कारण देत अर्ज बाद केलेल्या उमेदवारांपैकी चार ते पाच उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली होती. यातील एका उमेदवाराची कागदपत्रे ग्राह्य धरत न्यायालयाने त्याला निवडणूक लढविण्याची परवानगी दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अर्ज माघारी घेण्याची वेळ उलटल्यानंतरही न्यायालयाच्या ऑर्डरची प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त झालेली नसल्याने उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केलेली नाही. बुधवारी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून त्याच वेळी उमेदवारांना चिन्हांचे वाटपदेखील केले. यामुळे पुढील १० दिवस प्रचाराचा चांगलाच जोर चढणार आहे. बाजार समितीची निवडणूकदेखील राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केल्याने या निवडणुकीतदेखील मतांचा घोडेबाजार रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.