विकासकामात पर्यावरणाचा बळी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे ब्रीद वाक्य घेऊन राज्यात वृक्षलागवडीचे कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात येत आहे. असे असताना, दुसरीकडे ठाण्यातील घोडबंदर भागातील मानपाडा चितळसर, किसननगर, सेक्टर तीन पाचपाखाडी, बाळकुम आदी ठिकाणी इमारतीच्या बांधकामात, शाळांच्या पुनर्बांधणीसाठी ४४५ वृक्ष बाधित होत असून १७७ वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार असून २६८ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.
ठाणे शहरातील अनेक रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात सोसाट्याचा वारा आल्यानंतर या झाडांची पडझड होत असते. काही महिन्यापासून ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू झाली आहे. घोडबंदर सेवा रस्ता हा मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम सुरू आहे. तसेच कोस्टल रोड, बोरिवली येथील भुयारी मार्गामुळे बाधित होणाऱ्या हजारो वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. याचबरोबर ठाणे शहरातील घोडबंदर भागातील मानपाडा, बाळकुम यासह किसननगर येथील क्लस्टर योजनेतील यूआरसी एक व दोनमधील विकासकामातील ४४५ वृक्ष बाधित होत असून १७७ ठिकाणी कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. तर २६८ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.
-----------------------------------
हरकतींसाठी सात दिवसांची मुदत
माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत प्रभाग क्रमांक ३ (क), मानपाडा शाळा क्रमांक १०, ६४, ११३ शाळेच्या पुनर्बांधणीचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये किती वृक्ष बाधित होणार असून पुनर्रोपण तसेच तोडण्यात येणार याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच काही हरकती असल्यास सात दिवसांच्या आत दाखल करण्यात याव्यात, असे जाहिरातीत नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.