भातविक्रीचे पैसे पंधरा दिवसात मिळणार
मुरबाड, ता.२४ (बातमीदार)ः शेतकऱ्यांच्या खात्यात भात विक्रीच्या बोनसचे पैसे पंधरा दिवसात जमा होतील, असे आश्वासन तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी दिले आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांनी उपोषण मागे घेतले आहे.
मुरबाड तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांनी शासनाला २०२०-२१ मध्ये विकलेल्या भातासाठी जाहीर केलेला ८० लाख रुपये बोनस मिळावा तसेच २०२४-२५ सालाच्या भात विक्रीवर बोनस मिळावा, अशी रमेश हिंदुराव यांची मागणी होती. त्यानुसार ठाणे जिल्हा पणन विभागाकडून शेतकऱ्यांचे उतारे तपासणीचे काम सुरू आहे. या प्रक्रियेनंतर पात्र शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने बोनस दिला जाणार असल्याचे ठाणे जिल्हा पणन अधिकारी यांनी तहसीलदारांना लेखी कळविले आहे. २०२०-२१ च्या निधीच्या प्रस्तावावर फाईल स्वाक्षरी होताच ३० जूनच्या आत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील, असे वित्तीय सल्लागारांचे सचिव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.