पावसाच्या आगमनाने बळीराजाची लगबग सुरू

पावसाच्या आगमनाने बळीराजाची लगबग सुरू

Published on

पावसामुळे बळीराजा सुखावला
नांगरणी, पेरणीच्या कामांची लगबग सुरू
कासा, ता. २९ (बातमीदार)ः डहाणू तालुक्यात पावसाने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे बळीराजामध्ये नवचैतन्य संचारले असून, नांगरणी, पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे.
डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड तालुक्यात सध्या माळरानावर हळवी पेरणी सुरू झाली आहे. परंपरागत शेती पद्धतींना अनुसरून काही शेतकरी बैलजोडीच्या सहाय्याने नांगरणी करत आहेत. प्रारंभी कृषी विभागाने मुसळधार पावसामुळे पेरणी थांबवण्याचे आवाहन केले होते, मात्र आता हवामानाचा अंदाज लक्षात घेता विभागानेही पेरणीला परवानगी दिली आहे. सध्या भातशेतीसाठी लागणाऱ्या बी-बियाणे, खते, मजुरी आदींच्या किमती प्रचंड वाढल्या असून, उत्पादन खर्च गगनाला भिडला आहे. यामुळे भातशेती आर्थिकदृष्ट्या अधिकच आव्हानात्मक बनली आहे.
-------------------
यंदाचा हंगाम समाधानकारक
डहाणू तालुक्यात काही शेतकऱ्यांनी पाच-सहा दिवसांपूर्वी पेरणी केली होती, मात्र मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. परिणामी, पेरणी वाहून गेली असून, मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. सध्या शेतीमधील संकटे वाढली असली तरी परंपरागत पद्धतीने शेती करणे भाग झाले आहे, पण हवामानाची साथ लाभल्यास यंदाचा भात हंगाम समाधानकारक ठरेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com