उमेश विशे,

उमेश विशे,

Published on

मुंबईतील लोकल गर्दीवर एकमेव उपाय म्हणजे लोकल फेऱ्याची संख्या वाढविणे. गेली कित्येक वर्षे कसारा-कर्जत मार्गावर एकही लोकल नव्याने सुरू झाली नाही; मात्र वंदे भारत, मालगाड्यांची संख्या वाढत आहे, दुसरीकडे दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातानंतर कल्याण-कसारा तिसरी मार्गिका रेंगाळली आहे. गर्दीच्या वेळी ठाण्याहून कसारा-कर्जत शटल चालविणे गरजेचे आहे, जेणेकरून गर्दीचे विभाजन होईल; मात्र संघटनेने मागणी केली असता रेल्वे प्रशासन वेळापत्रक जाम असल्याचे कारण पुढे करते. त्यातच वातानुकूलित लोकल या गर्दीच्या वेळी रिकाम्या जात असतात. परिणामी, त्याचा भार मागून येणाऱ्या लोकलला बसतो आणि गर्दी उसळते. १५ डब्यांची लोकल, सर्व लोकलला दरवाजे, या अशा संकल्पना पुढे आणून रेल्वे प्रशासन मूळ मुद्याला बगल देत आहे. कल्याण-कुर्ला लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी समर्पित पाचवी-सहावी मार्गिका असताना या गाड्या गर्दीच्या वेळी तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेवरून चालविल्या जातात. यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडते.
- उमेश विशे, सचिव, कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com