बाहेरून येणाऱ्या चोरांना थांबवले पाहिजे
वाशी, ता. ३० (बातमीदार) : कोरोना काळामध्ये नवी मुंबई महापालिकेची औषधे, नवी मुंबईचे हक्कांचे पाणी पळवले आहे. चोरायचे व उलट बोंब मारायची, असा आरोप ठाण्यातील शिंदे सेनेच्या नेत्यांचे नाव न घेता वनमंत्री गणेश नाईक यांनी केला. ऐरोली सेक्टर १५ येथे गुणवंताचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मंत्री नाईक बोलत होते.
नवी मुंबईत बाहेरून येणाऱ्या चोरांना थांबवले पाहिजे. या चोरांना नवी मुंबईतून ‘चलो जाव’चा इशारा दिला पाहिजे, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिकेसाठी कर्जत तालुक्यात असणाऱ्या धरणातून ५०० एमएलडी पाणी राखून ठेवले असून, त्यासाठी ५०० कोटींची तरतूददेखील पालिकेकडे करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईला येणारा भविष्यकाळ हा चांगला आहे. नवी मुंबई महापालिकेत मागील २० वर्षे पाणी व मालमत्ता कर वाढलेला नाही. येणाऱ्या २० वर्षांतदेखील तो वाढवू देणार नसल्याचे नाईक म्हणाले. नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजीमध्ये शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेदेखील नाईक म्हणाले.
---------------------
आम्ही जहागीरदार नसून जनसेवक
एका कार्यक्रमामध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबई महापालिकेवर काही नेत्यांची जहागीरदारी असल्याचा आरोप गणेश नाईक यांच्यावर केला होता. त्यावर गणेश नाईक म्हणाले की, आम्ही नवी मुंबईचे जहागीरदार नसून जनसेवक आहोत. ठाणे-बेलापूर रस्त्यालगतदेखील भ्रष्ट लोकांनी भूखंड लाटले असल्याचा आरोप नाईक यांनी केला. नवी मुंबईतील असणारी गुंडागर्दी ही संपवण्यात आली असून, काही गुंडांना तडीपार केले असल्याचेदेखील नाईक म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.