टोल वसुलीविरोधात खानीवडेत आंदोलन

टोल वसुलीविरोधात खानीवडेत आंदोलन

Published on

मनोर, ता. ३० (बातमीदार)ः पालघर जिल्ह्यातील ससूनवघर-आच्छाड यादरम्यानच्या १२१ किलोमीटर अंतराच्या महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांवर वर्षभरात १७९ निरपराध नागरिकांनी जीव गमावला आहे. तरीदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते दुरुस्तीऐवजी भरमसाठ टोलवसुली करत असल्याने आमदार विलास तरे यांनी रविवारी सायंकाळी खानिवडे टोलनाक्यावर आंदोलन केले.
खानिवडे टोलनाक्यावर दररोज वाहनांच्या रांगा लागत असल्यामुळे वाहनचालकांसह प्रवासी, रुग्णांची गैरसोय होते. या मार्गाचे नुकतेच व्हाइट टॉपिंगचे काम करण्यात आले आहे. तरीदेखील खड्ड्यांमुळे महामार्गाची दुरवस्था झाली आहे, तर उड्डाणपुलांच्या अपूर्ण कामांमुळे वाहतूक कोंडीने स्थानिकांची गैरसोय होत आहे. असे असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मात्र स्थानिकांकडून टोलवसुली करत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार विलास तरे यांनी रविवारी सायंकाळी आंदोलन करताना तब्बल दोन तास टोलवसुली बंद पाडली होती.
--------------------------------
...तर पुन्हा आंदोलन
टोलनाक्यावर १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागल्यास टोल शुल्क माफ करण्याचा नियम आहे, मात्र वाहनचालकांना तासंतास रांगेत उभे केले जाते. तसेच टोलवसुली करीत असताना सुविधा देणे गरजेचे आहे. त्यामुळे खड्डे दुरुस्ती तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा आमदार तरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com