ठाकरे ब्रँडच्या धास्तीमुळेच हिंदी सक्तीचा जीआर रद्द
अंबरनाथ, ता. ३० (वार्ताहर) : सरकारने पहिलीपासून लागू केलेला हिंदी सक्तीचा निर्णय केवळ ठाकरे ब्रँडच्या धास्तीमुळेच रद्द केल्याची प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे. तसेच ५ तारखेला मोर्चा नाही; पण विजयी रॅली नक्की काढावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
राज्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेला पहिली ते पाचवी हिंदी सक्तीचा वाद अखेर निवळला आहे. सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केला आहे. ५ जुलैच्या हिंदी सक्तीविरोधात मोर्चाच्या नियोजनासाठी अंबरनाथ शहरात मनसे कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. मात्र, या बैठकीला अविनाश जाधव पोहोचण्यापूर्वीच सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय स्थगित केल्याचे जाहीर केले. त्यामुळे जाधव यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत विजयी मिरवणूक काढून फटाके फोडत मनसैनिकांनी आनंद साजरा केला. आता ५ तारखेला मोर्चा निघणार नसला, तरी विजय रॅली नक्की निघावी, अशी इच्छा असून राजसाहेब याबाबतचा निर्णय घेतील, असे जाधव म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत ५ तारखेलाच काय ते कळेल, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला. या वेळी मनसेचे उल्हासनगर, अंबरनाथमधील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.