खा. पीयूष गोयल यांनी घेतली नागरी समस्यांची दखल

खा. पीयूष गोयल यांनी घेतली नागरी समस्यांची दखल

Published on

खा. पीयूष गोयल यांनी घेतली नागरी समस्यांची दखल
गोराई कचरा हस्‍तांतरण केंद्रावरील कचरा हटवला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : वाणिज्य व उद्योगमंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या सूचनेनुसार गोराई कचरा हस्‍तांतरण केंद्रावरील कचरा हटवण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानानुसार, गोयल हे त्यांच्या उत्तर मुंबई मतदारसंघात स्वच्छतेला मोठे प्राधान्य देत आहेत. केंद्रात मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही ते स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून वेळोवेळी तत्काळ निर्णय घेत आहेत. येथील कचरा हटवला जात नसल्याबाबत स्थानिकांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत गोयल यांनी संबंधित विभागांना तातडीने कारवाईचे आदेश दिले होते.
या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची माहिती मिळताच गोयल यांनी पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सूचना केल्‍या. त्यानंतर पालिकेने तत्काळ कार्यवाही करीत येथील कचरा हटवला.
यापुढे अशा प्रकारच्या तक्रारी येऊ नयेत. दोषी ठेकेदार किंवा अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्‍पष्‍ट निर्देश गोयल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय गोयल हे उत्तर मुंबईतील इतर नागरी सुविधा व विकासकामांवरही लक्ष ठेवून आहेत. त्यांनी घेतलेल्या जनता दरबारांमध्ये अनेक प्रश्नांचा थेट आणि तातडीने निपटारा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com