म्हारळगावात जलशुद्धी केंद्राची संरक्षक भिंत कोसळली
जलशुद्धी केंद्राची संरक्षक भिंत कोसळली
उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : म्हारळ गावात असलेल्या एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्राची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना सोमवारी (ता. ३०) घडली आहे. धोबीघाटकडे जाणाऱ्या मुख्य नाल्यात ही भिंत कोसळल्यामुळे परिसरात मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही संरक्षक भिंत खेमानीपासून धोबीघाटकडे जाणाऱ्या नाल्याच्या बाजूला होती. भिंत कोसळल्याचा आवाज इतका प्रचंड होता की आजूबाजूच्या परिसरात लोकांची एकच धांदल उडाली. घटनेनंतर काही मिनिटांतच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. तातडीने प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, ते मलबा हटवण्याचे व सुरक्षेची पाहणी करण्याचे काम करत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाययोजना हाती घेण्याचे संकेत दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.