वर्षा पर्यटन स्थळांवर मनाई

वर्षा पर्यटन स्थळांवर मनाई

Published on

मनोर, ता. २४ (बातमीदार) : वर्षा पर्यटनादरम्यान घडणाऱ्या दुर्घटना रोखण्यासह पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वांद्री धरण, तांदूळवाडी आणि वाघोबा खिंडीतील धबधबा परिसरात मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. बंदी काळात प्रशासनाचे आदेश मोडणाऱ्या पर्यटकांविरोधात कारवाई केली जाणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील गांजे-ढेकाळे ग्रामपंचायतीतील वांद्री धरण, तसेच धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्याकरिता मोठ्या संख्येने पर्यटक परिसरात येतात. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्यासाठी उत्साही पर्यटक पाण्यात उतरून दुर्घटना घडण्याचा धोका असतो. सांडव्याच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुविधा उपलब्ध नसल्याने धरणाच्या पाण्यात बुडून पर्यटकांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या असून, २०२३ ते २०२५ या तीन वर्षांत वांद्री धरणात बुडून सात जणांचा मृत्यू झाला आहे.

तांदूळवाडी-चहाडे रस्त्यावरील तांदूळवाडी धबधबा, तसेच पालघर-मनोर रस्त्यावरील वाघोबा खिंडीतील धबधब्यावर पालघर, वाडा, डहाणू, वसई-विरार, मिरा रोड परिसरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. धबधब्याखाली बसून भिजण्यासह पर्यटक धबधब्याच्या उगम स्थानाकडे जाण्याची जोखीम पत्करतात. वाहत्या पाण्याचा आनंद घेण्यासह फोटो काढण्यासाठी पाण्यात उतरत असल्याचे दिसून येते. पालघरचे उपविभागीय दंडाधिकारी श्याम मदनूरकर यांनी वांद्री धरण, तांदूळवाडी आणि वाघोबा खिंडीतील धबधबा परिसरात मनाई आदेश जारी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com