संवेदना हरवलेल्या समाजाला कविताच योग्य रस्ता दाखवू शकते
‘संवेदना हरवलेल्या समाजाला कविताच योग्य रस्ता दाखवेल’
कवी सायमन मार्टिन यांचे प्रतिपादन
वसई, ता. २८ (बातमीदार) ः कविता आपल्याला मनाचा आवाज ऐकवते. संवेदना हे कवितेचं प्रथम वैशिष्ट्य आहे. संवेदना हरवलेल्या समाजाला कविताच योग्य रस्ता दाखवू शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन यांनी वसईत केले.
सहयोग लोककला मंचतर्फे आयोजित कवितोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी किशोर पवार, हरिश्चंद्र मिटबावकर, विक्रांत केसरकर, प्रांजली काळबेंडे, वीणा चाफेकर, मोहन वायकुळ, मधुकर तराळे, सचिन घरत, शीतल संख्ये, नयना हळबे, सुधा आफळे, विभूती चाफेकर, अमोल नाईक आदींनी आपल्या कविता सादर केल्या. एकापेक्षा एक कविता या वेळी सादर करण्यात आल्या. यामध्ये रसिकवर्ग न्हाऊन निघाली. याप्रसंगी कवियित्री कविता मोरवणकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
फोटोओळ
वसई : कवितोत्सव कार्यक्रमात कवितांची मैफल सजली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.