स्वच्छतागृहांअभावी नागरिकांची गैरसोय

स्वच्छतागृहांअभावी नागरिकांची गैरसोय

Published on

विक्रमगड, ता. ३१ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प करण्यात येत आहे. विक्रमगड शहर हे मुख्य तालुक्याचे ठिकाण आणि मोठी बाजारपेठ असलेल्याने बसस्थानक, पंचायत समिती परिसरात नगर पंचायत प्रशासन स्वच्छतागृह उभारणीबाबत उदासीन दिसून येत आहे.

अनेक वर्षांपासून शहरातील मुख्य वर्दळीच्या भागात सार्वजनिक स्वच्छतागृहाची सातत्याने मागणी होत आहे. नगर पंचायत प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे मुख्यत्वे करून महिलावर्गाची मोठी गैरसोय होत आहे. तालुक्यातील ९४ गाव-पाड्यांतील हजारो नागरिक विविध कामानिमित्त विक्रमगड शहराच्या वेगवेगळ्या भागांत येत असतात. तसेच सतत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक व बसस्थानकाच्या परिसरात स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध नसल्याने नागरिक, एसटी बस प्रवाशांसहित महिलावर्गाची मोठी गैरसोय होत आहे.

२० लाखांचा खर्च प्रस्तावित
विक्रमगड शहरात पाटीलपाडा, बाजारपेठेमधील एसटी स्थानक, पंचायत समिती या तीन ठिकाणचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात पाठविला आहे. स्वच्छतागृहांचे प्रशासकीय मान्यतेनंतर काम सुरू होईल. यासाठी स्वच्छ भारत योजनेतून २० लाखांचा निधी प्रस्तावित आहे, असे विक्रमगड नगर पंचायतीचे स्वच्छता निरीक्षक अलीम मुल्ला यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com