नवी मुंबई मधील टपाल कार्यालये टाकणार कात !
नवी मुंबईमधील टपाल कार्यालये टाकणार कात
आयटी २.० प्रणाली अपडेटसाठी ४ ऑगस्टदरम्यान बंद
पनवेल, ता. २ (बातमीदार) ः डाक विभागात सोमवार (ता. ४)पासून नवीन आयटी २.० प्रणाली लागू करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व डाक कार्यालयांतील सेवा सोमवारी तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत. या कालावधीत कोणतेही आर्थिक व्यवहार तसेच पत्र व्यवहार होणार नाही, अशी माहिती डाक अधीक्षक व्ही. सुरेश यांनी दिली.
आयटी २.० प्रणाली हे डाक विभागाच्या डिजिटल परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या प्रणालीमुळे सेवा वितरण अधिक जलद, ग्राहकाभिमुख, कार्यक्षम होणार आहे. सिस्टिमचे डेटा मायग्रेशन, कॉन्फिगरेशन आणि परीक्षण सुनिश्चित करण्यासाठी नियोजित डाऊनटाइम ठेवला आहे. परिणामी, चार दिवस कार्यालयीन व्यवहार स्थगित केले आहेत. या कालावधीत नागरिकांनी डाक कार्यालयातील भेटी आणि व्यवहारांचे आगाऊ नियोजन करावे, असे आवाहनही व्ही. सुरेश यांनी केले आहे.
नव्या प्लॅटफॉर्मद्वारे डाक विभाग अधिक स्मार्ट आणि भविष्यकालीन सेवांसाठी सज्ज होणार आहे. या बंदचा प्रभाव नवी मुंबईमधील कार्यालयांवर होणार आहे. ही स्थगिती डिजिटल परिवर्तनाचा भाग असून, प्रणालीच्या अपग्रेडसाठी आवश्यक असलेल्या डेटा मायग्रेशन, प्रणाली परीक्षण आणि तांत्रिक समायोजनासाठीही पावले उचलली जात आहेत. यानंतर ही नवी प्रणाली कार्यान्वित होणार असून, त्यानंतर सेवा अधिक वेगवान, सुरक्षित आणि ग्राहकाभिमुख स्वरूपात उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती विभागाकडून दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.