
विरार, ता. ४ (बातमीदार) : वसई, पालघर व ठाणे परिसर निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी अत्यंत अनुकूल आहे. येत्या पाच वर्षांत हा परिसर केळीच्या निर्यातीसाठी प्रमुख हब बनू शकतो, असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी केले. सुख संपत्ती संवर्धन सहकारी सोसायटी वसई आणि जैन इरिगेशन यांच्या तांत्रिक सहकार्याने वसई येथे निर्यातक्षम केळी उत्पादनावर परिषद पार पडली. या वेळी ते बोलत होते.
डॉ. पाटील म्हणाले, जैन टिश्यू कल्चर व्हायरस-मुक्त जी-९ जातीची रोपे, गादी वाफा, डबल लॅटरल आणि फर्टीगेशन तंत्र वापरल्यास १० ते ११ महिन्यांत केळी कापणीस येते. केळीचे स्कर्टिंग, फट्या व योग्य पॅकिंग करून ‘गोल्डन’ दर्जाचे फळ तयार करता येते. मुंबई बंदर जवळ असल्याने वसईला जळगाव, सोलापूरसारख्या भागांवर टप्पा घेता येऊ शकतो.
या परिषदेत अण्णासाहेब वर्तक ट्रस्टचे अध्यक्ष विकास वर्तक, बँकिंग तज्ज्ञ फ्रान्सिस डिसोझा, विन्सेंट आल्मेडा, पॅट्रिक आल्मेडा, ओनील आल्मेडा आदी मान्यवर उपस्थित होते. २०० हून अधिक शेतकरी परिषदेला उपस्थित होते. ओनील आल्मेडा यांनी सांगितले की, लहान शेतकऱ्यांनी वेलची, इलायची, रेड बनाना, नेंद्रन जातींची लागवड करावी. संस्थेमार्फत लवकरच या जातींची टिश्यू कल्चर रोपेही उपलब्ध करून दिली जातील. करार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तांत्रिक मदत दिली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.