धरमतर येथे नारळीपौर्णिमा उत्साहात
धरमतर येथे नारळी पौर्णिमा उत्साहात
पोयनाड, ता. ९ (बातमीदार) : अलिबाग तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या धरमतर येथे नारळी पौर्णिमा शुक्रवारी (ता. ९) उत्साहात साजरी करण्यात आली. धरमतर येथून वाहणाऱ्या अंबा नदीवरील खाडीत दर्यासागराला नारळ अर्पण करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दरम्यान, धरमतर येथील जुना पूल वाहतुकीसाठी आणि सर्वसामान्यांना येण्या-जाण्यासाठी बंद केल्याने नवीन आणि सध्याच्या वापरात असलेल्या पुलावरूनच सर्व वाहतूक सुरू होती. जवळच असलेल्या शहाबाज गावातील आणि परिसरातील अनेक तरुण या पुलावरून समुद्रात उडी मारण्याची परंपरा आहे. त्यामुळे तरुणांसह सर्वसामान्यांनी या धरमतर पुलावर गर्दी केली होती.
फोटो ओळ
पोयनाड : धरमतर येथे समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी कोळीबांधवांसह सर्वसामान्यांनी मोठी गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.