शेतकऱ्यावरील अन्यायाविरोधात रोष
पनवेल ता. ९ (बातमीदार)ः कासारभट येथील शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी अप्पर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी तत्कालीन तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून शेतकऱ्याचा सातबारा पुन्हा जिवंत करण्याची मागणी करण्यात आली.
साई येथील १०८ गुंठे जमीन बनावट कागदपत्रे तसेच खोटे सावकार उभे करून हडप करण्यात आली आहे. या प्रकारात भोंडकर कुटुंबाची फसवणूक झाली असून, तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्याचे अप्पर तहसीलदारांनी आंदोलकांना सांगितले. या वेळी सभापती नारायण घरत, पालिका जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, तालुका चिटणीस राजेश केणी, काँग्रेसचे सुदाम पाटील, पालिका महिला जिल्हाध्यक्ष हर्षला तांबोळी, शेकाप सहचिटणीस तेजस्विनी घरत, पुरोगामी जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.