एनएसएसच्या विद्यार्थिनींनी पोलिसांच्या हातावर बांधली राखी

एनएसएसच्या विद्यार्थिनींनी पोलिसांच्या हातावर बांधली राखी

Published on

भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : भाईंदर येथील अभिनव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएनएस) विद्यार्थिनींनी राखी पौर्णिमेनिमित्त नवघर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना राखी बांधली. कर्तव्य बजावत असाताना पोलिसांना नाती बाजूला ठेवावी लागतात. त्यामुळे समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचे हात राखीशिवाय रिकामे राहू नयेत, या उद्देशाने त्यांच्या हातावर राखी बांधून सणाचा आनंद साजरा करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने विद्यार्थिनींनी केला. आपल्या सुरक्षेसाठी पोलिस करत असलेल्या अथक प्रयत्नांच्या कृतज्ञतेपोटी, तसेच समाज व कायदा अंमलबजावणी या यंत्रणेमधील दुवा अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला, अशी माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली. या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या २५ ते ३० विद्यार्थिनी शिक्षकांसोबत पोलिस ठाण्यात उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. अल्विन मेनेझेस, समन्वयक प्रा. अरुणा गुजर, कार्यक्रम अधिकारी प्रा. भाग्यश्री माने, प्रा. तरुशी सिंह यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com