सामाजिक कार्यकर्त्याच्या मृत्यूत घातपाताचा संशय

सामाजिक कार्यकर्त्याच्या मृत्यूत घातपाताचा संशय

Published on

भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) : तालुक्यातील पूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ता आकाश जाधव यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या आई नयना जाधव यांनी धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या मते, हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्या आहे. त्यांनी भिवंडी पोलिस उपायुक्तांना निवेदन सादर करून या प्रकरणाची सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नारपोली पोलिस ठाणे हद्दीत १३ जुलैला एका वाहन अपघातात आकाशचा मृत्यू झाला. संबंधित ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती; मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. हा अपघात नसून हत्येचा कट रचून अपघात भासवण्यात आला आहे, असा दावा जाधव यांनी निवेदनात केला आहे.
त्यांनी पोलिसांना घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची, आकाशच्या मोबाईलचा सीडीआर अहवाल मिळवण्याची आणि मृत्यूपूर्वी त्याचा कोणाशी वाद झाला होता का हे शोधण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, आकाश हे दलित समाजातील सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी प्रशासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे काही समाजकंटकांनी कट रचून त्यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, न्याय मिळवण्यासाठी नागरिकांनीही सखोल तपासाची मागणी केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com