उल्हास नदीला पूर
उल्हास नदीला पूर
रायगड जिल्ह्यात मुसळधार तर बदलापुरात संततधार!
बदलापूर, ता. १८ (बातमीदार) : हवामान खात्याने ४८ तासांसाठी मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला असून, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होत आहे. बदलापुरात पावसाचा जोर जास्त नसला तरी उल्हास नदी उगम पावते त्या रायगड जिल्ह्यात जोरधार पाऊस पडत आहे. परिणामी बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ होत आहे.
काही दिवसांपूर्वी शांत झालेल्या पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. दहीहंडीपासूनच मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात चांगला पाऊस कोसळत आहे. याचाच परिणाम हा रायगड जिल्ह्यातून उगम पावणाऱ्या उल्हास नदीवर होत असून, बदलापुरातून वाहणाऱ्या नदीपात्रात कमालीची वाढ झाली आहे. सध्यातरी उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठावरील चौपाटीच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या असून, पुढील २४ तास पावसाचा जोर कायम राहिला, तर मात्र उल्हास नदी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील धोका ओळखून स्थानिक प्रशासन नदीच्या पाण्याची नोंद घेत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.