भातसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भातसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Published on

शहापूर, ता. १९ (वार्ताहर) : मुंबई व ठाणे या महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील पाटबंधारे खात्याच्या भातसा धरणक्षेत्रात गेल्या ४८ तासांत संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. यामुळे धरणाचे पाच दरवाजे मंगळवारी (ता. १९) दुपारी ४.३० उघडण्यात आले आहेत.
भातसा धरणाची पाणी पातळी मंगळवारी १३९.७० मीटर इतकी असून, धरणाच्या जलग्रहण आणि लाभ क्षेत्रात सततचा पाऊस पडत आहे. पाण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणाची पाच वक्रद्वारे या आधी ०.५० मीटरने उघडण्यात आली होती. मात्र, मंगळवारी दुपारी ४.३० वाजता पाच वक्रद्वारे ०.२५ मीटरने आणखी वाढवून एकूण ०.७५ मीटरने उघडण्यात आली. परिणामस्वरूप भातसा धरणातून ६६.२५ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग प्रवाहीत करण्यात येत आहे. यामुळे भातसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ग्रामसेवक, तलाठी व सरपंचांनी ग्रामस्थांना दक्षता बाळगण्याबाबत सूचित करण्याचे आदेश दिल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विनोद कंक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com