‘तंदुरुस्‍त भारत’ संकल्‍पनेवर आधारित रॅलीला प्रतिसाद

‘तंदुरुस्‍त भारत’ संकल्‍पनेवर आधारित रॅलीला प्रतिसाद

Published on

‘तंदुरुस्‍त भारत’ संकल्‍पनेवर आधारित रॅलीला प्रतिसाद
मुंबई ः ‘तंदुरुस्‍त भारत’ या संकल्पनेवर आधारित सायकल रॅलीचे आयोजन महाराष्ट्र बटालियन एनसीसी, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
रॅलीचे उद्‌घाटन कर्नल धीरेंद्रसिंग सयाना, कर्नल प्रखर सिन्हा, एनसीसी अधिकारी डॉ. गौरंग राजवाडकर, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या जयश्री गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले. या रॅलीत एकूण १५० एनसीसी कॅडेट्सनी उत्साहाने सहभाग नोंदवला. रॅली साठये महाविद्यालयापासून जुहू बीचपर्यंत होती. या रॅलीच्या माध्यमातून समाजामधील सर्वांना विशेषतः तरुणाईला आरोग्य, तंदुरुस्ती व शिस्तीचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी सायकलिंगचा स्वीकार हा आरोग्यदायी आणि शाश्वत जीवनशैलीचा पर्याय म्हणून करावा, असा संदेश रॅलीतून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com