रेल्वे फाटकाविरोधात बोईसरमधील नागरिकांना संताप

रेल्वे फाटकाविरोधात बोईसरमधील नागरिकांना संताप

Published on

तारापूर, ता. २० (बातमीदार) : पश्चिम रेल्वेवरील बोईसर स्थानकाजवळ असलेल्या फाटकामुळे नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या भुयारी मार्ग आणि पादचारी पुलाचे काम सुरू झालेले नाही. याप्रकरणी बोईसरमधील नागरिकांनी ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करत हे काम त्वरित सुरू न झाल्यास ९ सप्टेंबरला जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

बोईसर, वंजारवाडा येथील एल.सी.-५२ रस्ता हा बोईसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून तो मुंबई-अहमदाबाद महामार्गाशी जोडला जातो. तसेच शिरगाव, हनुमाननगर खाडीसह पुढे अनेक गावांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे; परंतु या मार्गावर दररोज लोकांची मोठी वर्दळ असूनही कोंडी व रेल्वे फाटकामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे फाटक बंद असल्याने वाहनचालकांना खूप वेळ प्रतीक्षा करावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांना, रुग्ण, तसेच कामावर जाणाऱ्या नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते.

सरपंच दिलीप धोडी, नीलम संखे, सदस्य आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्र येत मोर्चा काढण्याचा ठराव मंजूर केला आहे. भुयारी मार्ग आणि पादचारी पुलाची कामे तातडीने सुरू करण्यात यावीत, अशी मागणी बोईसर ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. ही कामे सुरू न झाल्यास ९ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com