
डांबर गेले वाहून, राहिली फक्त खडी
भिवंडी-वाडा महामार्गाची बिकट अवस्था
वज्रेश्वरी, ता. २३ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिवंडी-वाडा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर वाहून गेले असून फक्त खडी उरली आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे मोठे दिसत असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
अंबाडी, दुगाड फाटा, म्हपोली, आनगाव, पारिवली, शेलार, बोरपाडा या भागांमध्ये रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांची घसरून पडण्याची घटना वाढली आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांवर गाळ साचून रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. काही ठिकाणी एक-दीड फूट उंचीचे खड्डे दिसून येत आहेत. सिमेंटच्या साइडपट्ट्यांमुळे खड्डे अधिक वाढले असून, वाहनांचे नियंत्रण सुटण्याच्या घटना घडत आहेत. दुचाकीस्वारांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
वाहतूक मंदावली
हा विषय विधान परिषदेतदेखील मांडण्यात आला होता. आमदार प्रवीण दरेकर यांनी १८ डिसेंबर २०२३ रोजी या रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. त्या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची घोषणा केली होती; मात्र आश्वासनांच्या उलट अजूनही रस्त्यांची स्थिती सुधारलेली नाही. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक खूपच मंदावली असून, मोठ्या वाहतुकीत, विशेषतः हायवा, कंटेनर आणि डम्पर यांची गती मंदावली आहे. शेलार ते अंबाडी नाका मार्गावर दिवसभर वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.