पर्यावरणपूरक विसर्जनावर नवी मुंबईकरांचा भर
पर्यावरण संवर्धनाला पाठबळ
११ हजार गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ : गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत प्रदूषित होतात. असे प्रकार रोखण्यासाठी नवी मुंबई पालिकेने गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी १४३ कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. या तलावांमध्ये नवी मुंबईत तब्बल ११ हजारपेक्षा जास्त मूर्तींचे विसर्जन झाले आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेच्या प्रयत्नांना नवी मुंबईकरांनी पुढाकार घेताना पाठबळ दिले आहे.
दीड दिवस तसेच पाचव्या दिवशी निर्विघ्न विसर्जन सोहळ्याप्रमाणेच सातव्या दिवशी गौरी-गणपतीचा विसर्जन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. शहरातील २२ नैसर्गिक आणि १४३ कृत्रिम विसर्जन तलावांवर हा सोहळा पार पडला. सातव्या दिवशीच्या विसर्जन सोहळ्यात १७ हजार २३६ श्रीगणेशमूर्तींचे तसेच एक हजार ९५९ गौरींचे विसर्जन करण्यात आले. सातव्या दिवशी तीन हजार ६०९ शाडूच्या श्रीमूर्तींचे विसर्जन करून नागरिकांनी पर्यावरणाविषयी नवी मुंबईकर जागरूक असल्याचे दाखवून दिले. शाडूच्या मूर्ती प्रतिष्ठापना करणाऱ्या विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांना महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीचे स्वच्छता व पर्यावरणमित्र प्रशस्तिपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
-------------------------------------
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या श्रींच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे, या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. पालिकेतर्फे संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रात १४३ एवढ्या मोठ्या संख्येने कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्यात आले होते. जवळपास ११ हजार २३५ श्रीगणेशमूर्तींचे येथे विसर्जन करून पर्यावरणप्रेमी नागरिकांनी नैसर्गिक जलस्त्रोतांच्या रक्षणाचा दृष्टिकोन जपला. या विसर्जन तलावांमुळे घरापासून जवळ शांततेत मनोभावे विसर्जन करता आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
----------------------------------------
तीन हजार ६०९ शाडू मूर्तींचा समावेश
पालिका क्षेत्रातील २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर तीन हजार ८६० घरगुती तसेच १८२ सार्वजनिक मंडळांच्या चार हजार ४२ श्रीमूर्तींचे विसर्जन झाले. तसेच १४३ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ११ हजार २०७ घरगुती तसेच २८ सार्वजनिक मंडळांच्या ११ हजार २३५ श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे १५ हजार ६७ घरगुती व २१० सार्वजनिक मंडळांच्या एकूण १५ हजार २७७ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले. यात शाडूच्या तीन हजार ६०९ श्रीगणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक दृष्टिकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. तसेच एक हजार ९५९ गौरींचे विसर्जन करण्यात आले.
-----------------------------------------
२४ टन निर्माल्य गोळा
स्वच्छ शहर म्हणून असलेला नवी मुंबई पालिकेचा नावलौकिक जपण्यासाठी सर्व विसर्जन स्थळांवर ओल्या, सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवले आहेत. येथील निर्माल्य सातत्याने संकलन वाहनांद्वारे उचलून नेले जात असून, तुर्भे येथील प्रकल्पस्थळी निर्माल्याचे स्वतंत्र संकलन करून विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आतापर्यंत २४ टन ४४० किलो निर्माल्य वाहून नेण्यात आले आहे.
-------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.