परतीचा प्रवास होणार निर्विघ्न

परतीचा प्रवास होणार निर्विघ्न

Published on

परतीचा प्रवास होणार निर्विघ्न
रोह्यातून ग्रुप बुकिंग, तर पनवेलसाठी अर्धा तासाने गाड्या
रोहा, ता. ४ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत असल्यामुळे कोकणवासीय जिल्ह्यात दाखल झाले होते. सात दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करून कोकणवासीय मुंबईला परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत. पहिल्याच दिवशी रोहा आगारातून ४५ गाड्या ग्रुप बुकिंगसाठी, तर २७ गाड्या या आरक्षित तिकिटे सुविधा असलेल्यांना, तर पनवेलपर्यंत जाण्यासाठी २० गाड्या राखीव ठेवल्या आहेत. राखीव गाड्या दर अर्धा तासाने विनावाहक पद्धतीने सोडण्यात येणार आहेत. याशिवाय ग्रामीण भागातून रोह्यात येण्यासाठी पुरेशा गाड्यांचे नियोजनही केले असल्याची माहिती रोहा आगारप्रमुख प्रकाश शेलार यांनी दिली.
रोह्यासह लगतच्या तळा, म्हसळा, मुरूड, अलिबाग या तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिक नोकरी, धंदा यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई व अन्य शहरात वास्तव्य करून राहतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही सर्व मंडळी आपापल्या गावी येतात. यावर्षीदेखील मोठ्या संख्येने गणेशभक्‍त कोकणात दाखल झाले होते. दरम्यान, लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर ते पुन्हा आपल्या कुटुंबासमवेत परतीच्या प्रवासासाठी बुधवारी (ता. ३) निघाले. त्यांचा परतीचा प्रवास सुखकर आणि निर्विघ्न होण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या रोहा आगाराने नियोजन केले आहे. रेल्वेप्रमाणेच एसटी महामंडळाने बुधवारी परतीच्या प्रवाशांची वाढणारी संख्या लक्षात घेत चांगले नियोजन केले आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेत सहकार्य करावे, असे आवाहन रोहा आगारप्रमुख प्रकाश शेलार यांनी केले आहे.
...................
गाड्यांचे आरक्षण फुल्ल
कोकण रेल्वे, एसटी, खासगी वाहने इत्यादी माध्यमातून कोकणवासीय मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले आहेत. गाैरी-गणपतींचे विसर्जन केल्यानंतर ते पुन्हा कामाच्या ठिकाणी परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. रेल्वेसह, खासगी गाड्या उपलब्ध असल्या तरी एसटी गावामध्ये, वाडीपर्यंत येत असल्यामुळे, तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या तिकीटदरातील सवलतीमुळे तिला उत्तम प्रवासाचा पर्याय म्‍हणून निवडला जात आहे. त्यानुसार अनेक गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून, अद्याप आरक्षण सुरू आहे. अगदी ७ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
..................
राखीव गाड्यांचा लाभ
ज्यांना आपल्या गावापासून एसटी बस उपलब्ध व्हावी, यासाठी ग्रुपबुकिंग सेवा दिली आहे. यामध्ये मुंबई व अन्य ठिकाणी ते राहात असतील तेथे जाण्यासाठी ४५ गाड्या या मध्यमातून सेवा देतील. यासोबत रोहा, तळा, कोलाड, इंदापूर, नागोठणे बसस्थानकावरून आरक्षण सुविधेसह प्रवास करता यावा, यासाठी २७ गाड्या सोडण्यात आल्या आहेत. पनवेल येथून रेल्वेने मुंबई उपनगरे व अन्य ठिकाणी जाणे सोयीस्कर पडत असल्यामुळे पनवेल येथे जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यासाठी रोहा बसस्थानकावर २० गाड्या राखीव ठेवल्या असून, प्रवाशांना रोहामध्येच तिकिटे देत या गाड्या विनावाहक दर अर्धा तासाने सोडण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com