महापालिकेत १६५ नगरसेवक हवेत
विरार, ता. ८ (बातमीदार) : महापालिका निवडणुकांसाठी २०११ च्या जनगणनेच्या आधारावर महापालिका क्षेत्रात २९ प्रभाग व ११५ नगरसेवकांची घोषणा केलेली आहे, मात्र ही तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीची आहे. सध्या नवीन लोकसंख्येच्या आधारावर महापालिका क्षेत्रात किमान ४० प्रभाग व १६५ नगरसेवकांची गरज असल्याचे मत समाजसेवक चरण भट यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक आयोगाने जनगणनेच्या आधारावर प्रभाग व नगरसेवक वाढवावेत, अशी मागणी करत याबाबत त्यांनी जनगणना व निवडणूक आयोगाला पत्रे देत हरकत व्यक्त केली आहे.
वसई-विरारमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्राबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेत महापालिकेने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात २५.५ लाख नागरिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा वापर करत असल्याचा उल्लेख केला आहे. महापालिका क्षेत्रात ३३ लाखांच्या आसपास नागरिक राहत असल्याबाबत खुलासा केला आहे. दुसरीकडे २०११ च्या जनगणनेवर आधारित केवळ १३ लाख लोकसंख्येच्या आधारावर प्रभागरचना करण्यात आलेली आहे, हे योग्य नाही. यामुळे येथील नागरी समस्या अजून जटील होऊन जनप्रक्षोभ वाढेल. मुळात पालिकेकडे जनसंख्येचा विस्तृत अहवाल असतानाही त्यांनी याबाबत राज्य सरकार व निवडणूक आयोगाला कळवलेले नाही, असे स्पष्ट होत आहे. येत्या दहा दिवसांत यावर जनहितार्थ निर्णय न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा इरादा असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुलभूत अधिकारांवर घाला
महापालिकेच्या दुटप्पी भूमिकेचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागणार आहे. नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवरही घाला घातला जाणार आहे. याकरिता वाढीव लोकसंख्येबाबत महापालिकेने याबाबत राज्य सरकारला व निवडणूक आयोगाला सूचित करून महापालिका क्षेत्रात त्वरीत तात्पुरती जनगणना करावी व प्रभाग, नगरसेवकांची संख्या वाढवावी, अशी मागणी भट यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.