सचिव नोवेल साळवे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सचिव नोवेल साळवे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published on

खड्ड्यांची सरकार व अंदाज समितीकडून चौकशीची मागणी
शरद पवार गटाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कल्याण, ता. ८ (वार्ताहर) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे महाराष्ट्राभर गणरायाचा प्रवास खड्ड्यांमधून झाल्याने याची चौकशी राज्य सरकार व विधानसभा अंदाज समितीकडून करण्याची मागणी शरद पवार गटाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रासहीत संपूर्ण ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्राभर गणपतीचे आगमन आणि निरोपाचा प्रवास खड्ड्यांतूनच झाला. हीच अवस्था गावी गेलेल्या नागरिकांचीही होती. त्यांनाही खड्ड्यांतून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला. जनतेच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून सर्वत्र निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने रस्त्यांची खराब अवस्था झाली आहे. याची दखल राज्य सरकारने घेतली पाहिजे.
आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभा अंदाज समितीने या विषयाकडे लक्ष दिलेले दिसत नाही. त्यामुळे विधानसभा अंदाज समितीने सार्वजनिक बांधकाम विभागात आणि पालिका प्रशासनाच्या रस्त्यांच्या व इतर कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी आढळणारे ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी नोवेल साळवे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com