१२ तास ड्युटीला कामगारवर्गात संमिश्र प्रतिक्रीया
१२ तास ड्युटीला कामगारवर्गात संमिश्र प्रतिक्रिया
खोपोली, ता. ९ (बातमीदार) ः केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार राज्यात औद्योगिक वाढ व अधिक गुंतवणूक होण्यासाठी राज्य सरकारने औद्योगिक धोरणाला चालना देण्यासाठी कामगार कायद्यात काही बदल करण्याचे ठरवले आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
यात दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा पूर्वीच्या नऊ तास ऐवजी १२ तास तसेच तीन महिन्यांत ११५ तास ओव्हर टाइमऐवजी १४४ तास ओव्हर टाइम असे बदल होणार आहेत. तसेच विश्रांतीचा कालावधी पाच तासांत ३० मिनिटे वरून सहा तासांत ३० मिनिटे असा बदल कामगार कायदा अधिनियमात करण्यात येणार आहे. हे बदल करताना कामगारांना योग्य मोबदला व दुप्पट ओव्हर टाइम मिळणार असल्याचे सांगितले जात असल्याने, औद्योगिक क्षेत्रात कामगारांची उपलब्धता अधिक सुरळीत होईल व गुंतवणूकदार महाराष्ट्र राज्यात आकर्षित होतील. शासन व कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार यात कामगारांनाही अधिक आर्थिक लाभ होणार आहे. त्यांना १२ तास ड्युटीचा व अधिक ओव्हर टाइममुळे आर्थिक फायदा मिळणार आहे. या निर्णयाचे औद्योगिक क्षेत्रात स्वागत होत असून, कामगार क्षेत्रात मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.