मराठा आरक्षणप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका
मराठा आरक्षणप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका
विरार, ता. ९ (बातमीदार) : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत राज्य सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेले परिपत्रक तत्काळ रद्द करावे, तसेच हैदराबाद गॅझेटनुसार जात नोंदींमध्ये होत असलेला फेरफार थांबवावा, या मागणीसाठी अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेचा क्रमांक ३०२९६/२०२५ असून, ही याचिका मंगळवारी (ता. ९) दाखल करण्यात आली. संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी ॲड. सतीश तळेकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर बुधवारी (ता. १०) प्रथम सुनावणी होणार आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणारे व मूळ ओबीसींना अन्याय करणारे निर्णय कुठल्याही परिस्थितीत मान्य होऊ देणार नाही. न्याय मिळवण्यासाठी आम्ही संघर्षपथावर आहोत, अशी माहिती संघटनेचे पालघर जिल्हाप्रमुख शान्तेश्वर गुमते यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.