…तर विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही
...तर विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही
खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा
भिवंडी, ता. १० (वार्ताहर) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, ही मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. या मागणीला केंद्र सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करीत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे, की जोपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही, तोपर्यंत विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही. खासदार म्हात्रे यांनी बुधवारी (ता. ३) पत्रकार परिषद घेत ही भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, की राज्य सरकार, स्थानिक राजकीय पक्ष व भूमिपुत्र या नावाला पाठिंबा देत आहेत, तरी केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि मुद्दाम वेळकाढूपणा केला जात आहे.
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रविवारी (ता. १४) भिवंडी ते नवी मुंबई जासई गावापर्यंत भव्य कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत दोन हजारपेक्षा अधिक चारचाकी वाहने सहभागी होतील. ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई व मुंबई येथून हजारोंच्या संख्येने आगरी- कोळीबांधव सहभागी होणार आहेत. ही रॅली केंद्र सरकारला जागे करण्यासाठी असून, हा केवळ ट्रेलर आहे, पिक्चर दाखवायला भाग पाडू नका, असा इशारादेखील त्यांनी दिला.
संपूर्ण बहुजनांचे लोकनेते
खासदार म्हात्रे म्हणाले, दि. बा. पाटील हे फक्त आगरी समाजाचे नव्हते, तर पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार होते. त्यांनी ओबीसी समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी व स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी महत्त्वाचे कायदे आणले, त्यामुळे ते बहुजनांचे खरे लोकनेते होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.