वायू गळतीची उच्च न्यायालयाकडून दखल
वायुगळतीची उच्च न्यायालयाकडून दखल
अधिकाऱ्यांद्वारे बाधित भागांच्या तपासणीचे संकेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः चेंबूरमधील राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर (आरसीएफ) प्रकल्पामधील वायुगळतीच्या घटनेसोबतच गॅसगळतीच्या अन्य घटनांची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. तसेच विधि सेवा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पुढील तपासणीसाठी बाधित भागात पाठवले जाईल, असेही संकेत दिले.
वायुगळतीच्या घटनांवर प्रकाश टाकणाऱ्या बातम्यांची दखल घेऊन मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. चेंबूर घटनेव्यतिरिक्त वायुगळतीमुळे चार जणांचा मृत्यू झाल्याच्या अलीकडील घटनेचीही न्यायालयाने नोंद घेतली. याव्यतिरिक्त आणखी एक घटना घडली आहे. विधि सेवा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पुढील तपासणीसाठी बाधित भागात पाठवले जाईल, असे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले.
---
काय घडले होते?
चेंबूर येथील आरसीएफ प्रकल्प भागातील रहिवाशांना सोमवारी सकाळी श्वास घेण्यास त्रास होणे, डोळे, त्वचा जळजळ होणे आणि मळमळ होणे, अशी लक्षणे आढळून आली. त्यांनी परिसरात तीव्र रासायनिक वास आणि दाट धुके असल्याचे सांगितले. त्यामुळे वायुगळतीचा संशय व्यक्त करण्यात आला. तथापि, आरसीएफ अधिकाऱ्यांनी वायुगळतीची शक्यता नाकारली. दुसऱ्या एका घटनेत तारापूर एमआयडीसीतील सालवाड आणि शिवाजीनगरमधील रहिवाशांमध्ये वायुगळतीच्या वृत्ताने भीती पसरली होती. यापूर्वी २१ ऑगस्ट रोजी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मेडली कंपनीत वायुगळतीमुळे चार कामगारांचा मृत्यू झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.