श्रीवर्धन किनाऱ्यावर ६० लाखांचे चरस जप्त
श्रीवर्धन किनाऱ्यावर ६० लाखांचे चरस जप्त
श्रीवर्धन, ता. १२ (वार्ताहर) : श्रीवर्धन किनाऱ्यावर शुक्रवारी (ता. १२) दुपारी अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. मणेरी नानवली गावच्या हद्दीतील समुद्रकिनारी एकाने विक्री करण्याच्या उद्देशाने टाकून दिलेला ११ किलो ९६६ ग्रॅम वजनाचा चरस हा अमली पदार्थ पोलिसांच्या हाती लागला. या अमली पदार्थांचे बाजारमूल्य तब्बल ५९ लाख ८३ हजार रुपये इतकी असल्याचे समजते. याप्रकरणी दिघी सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत हा चरस परदेशातून समुद्रमार्गे आणून किनाऱ्यावर टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या मागील टोळी व संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके स्थापन केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.