बागायतदारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

बागायतदारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

Published on

बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी
बोर्डी, ता. १४ (बातमीदार) : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत झाई, बोरीगाव, ब्राह्मणगव या तीन गावांतील बागायतदारांना वगळल्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने याबाबत पुनर्विचार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
अवकाळी पावसाने थैमान घातल्याने तलासरी तालुक्यातील झाई, बोरीगाव, ब्राह्मणगाव तसेच शेजारी असलेल्या डहाणू तालुक्यातील बोर्डी जांबूगाव रामपूर घोलवड भागात चिकू, आंबा व भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. या सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते; मात्र कृषी विभागाने फक्त डहाणू तालुक्यातील बागायतदारांना नुकसानभरपाई देण्यासाठी पाहणी करण्याचे आदेश दिले. परंतु बोर्डी गावाला लागून असलेल्या तलासरी तालुक्यातील झाई, बोरीगाव आणि ब्राह्मणगाव या तीन गावांना आणि या गावांतील बागायतदारांना नुकसानभरपाई देण्यापासून वगळण्यात आल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. याविषयी कृषी अधिकारी, तहसीलदार तलासरी यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले होते. मात्र आजपर्यंत कोणताही निर्णय न झाल्यामुळे बागायतदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. संबंधित विभागाने या भागातील बागायतदारांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com