पंजाबच्या पुरग्रस्तांसाठी मुंबईची ‘मेघाश्रेय’ संस्था आशेचा किरण
पंजाबच्या पूरग्रस्तांसाठी मुंबईची मेघाश्रेय संस्था आशेचा किरण
जोगेश्वरी, ता. १४ (बातमीदार) ः पंजाबमधील पुरामुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, घरे वाहून गेली आहेत, तर अनेकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये मेघाश्रेय संस्था एक दिलासा देणारा किरण ठरली आहे. समाजसेविका सीमा सिंह यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने पूरग्रस्त भागांत मदतीचा हात दिला आहे. मेघाश्रेयच्या स्वयंसेवकांनी पूरग्रस्तांना अन्नधान्य, पिण्याचे पाणी, चादरी, चहा-नाश्ता आदी आवश्यक साहित्याचे वाटप केले. फक्त वस्तू देणे हा उद्देश नाही, तर संकटग्रस्तांच्या चेहऱ्यावर आशेचे हसू आणणे, ही खरी सेवा आहे, असे सीमा सिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान, पंजाबमधील पूर ओसरला असला तरी जीवन पूर्वपदावर येण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मेघाश्रेय संस्थेकडून शालेय साहित्य, वैद्यकीय मदत व मानसिक आधार पुरवण्याचे कामही सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.