कचरा प्रकल्प हटविण्याची मागणीच्

कचरा प्रकल्प हटविण्याची मागणीच्

Published on

कचरा प्रकल्प हटविण्याची मागणी
कल्याण, ता. १६ (बातमीदार) : सूचक नाका टेकडीवरील कचरा प्रकल्प बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांनी आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित विविध समस्या निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. याच प्रकल्पाला लागून परिसराला पाणीपुरवठा करणारी टाकी आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे टाकी प्रभावित होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प येथून हटविण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. याबाबत आंदोलनाचा इशारा आरपीआय आठवले गटाकडून देण्यात आला आहे.

शेकडो कुटुंबांना होणारा त्रास टाळण्यासाठी स्थानिक लोकवस्तीपासून हा कचरा प्रकल्प दूर न्यावा, अशी स्पष्ट मागणी स्थानिकांनी केली आहे. कचरा प्रकल्प जवळ असल्याने परिसरात दुर्गंधी, रोगराई आणि इतर पर्यावरणीय दुष्परिणामांचा धोका नागरिकांनी अधोरेखित केला आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरात लवकर कृती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आरपीआय आठवले गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनावणे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com