कामगाराच्या मृत्यूप्रकरणी कंपनी मालकांवर गुन्हा दाखल
कामगाराच्या मृत्यूप्रकरणी कंपनीमालकावर गुन्हा दाखल
भिवंडी, ता. १५ (वार्ताहर) : शहरातील पेपर मिल कंपनीत काम करणाऱ्या कामगाराला कंपनीमालक व व्यवस्थापकाने सुरक्षेचे कोणतेही साधन पुरवले नसल्याने त्याचा हात मशीनमध्ये गेल्याने गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती. या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कामगाराच्या कुटुंबीयांनी कंपनीमालकासह व्यवस्थापकाविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी (ता. १४) गुन्हा दाखल केला आहे. राजकुमार भारतीय (वय ३८) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. राजकुमार हा सरवली येथील लक्ष्मी पेपर मिल येथे काम करत होता. ३० जुलै २०२५ रोजी पेपर मशीनमध्ये हात गेल्याने त्यास गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान १४ ऑगस्ट २०२५ रोजी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंपनीतील पेपर मेकर आसिफ अब्बास सय्यद (वय ५४) व भोलानाथ उदयपाल सिंह (वय ५४) या दोघांविरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.