ई-पीक पाहणीसाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
ई-पीक पाहणीसाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
नुकसानभरपाई, मदतीसाठी नोंदणी गरजेची, शेतकऱ्यांना केले आवाहन
विक्रमगड, ता. १७ (बातमीदार) : खरीप हंगामाच्या ई-पीक पाहणीसाठी रविवार (ता. १४) ही तारीख अंतिम होती. मात्र शासनाकडून काही दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीसाठी २० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. पहिल्यांदा ऑगस्ट २०२५ ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत नोंदणीसाठी वेळ देण्यात आला होता. दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी नोंदणी करू शकले नाहीत. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांनी स्वतः शेतात जाऊन ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंद करणे आवश्यक आहे. ही नोंद केल्याशिवाय नुकसानभरपाई किंवा अनुदान मिळणार नाही. महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. सततच्या पावसामुळे भातपिकावर किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भातपिकाची अवस्था खराब होत चालली आहे. जिल्ह्यातील भातपिकाचे तसेच नागली आणि इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामानात सुधारणा झाली नाही, तर अतिवृष्टीमुळे भातपीक वाया जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी सरकारकडून नुकसानभरपाई किंवा अनुदान जाहीर झाल्यास फक्त ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे. त्यामुळे विक्रमगड तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांनी वाढीव दिलेल्या वेळेचा फायदा घेऊन ई–पीक पाहणी करणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.