दोन कर्मचाऱ्यांची आयुक्तांकडून उचलबांगडी

दोन कर्मचाऱ्यांची आयुक्तांकडून उचलबांगडी

Published on

भिवंडी, ता. १७ (बातमीदार) : केंद्र सरकार पुरस्कृत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ (एनयूएलएम) अंतर्गत कार्यरत असलेले शहर अभियान व्यवस्थापक कैलास राजधर पाटील व संजय ठाकरे यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश भिवंडी निजामपूर महापालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी दिले आहेत. याबाबतचे पत्र त्यांनी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या सहआयुक्तांना पाठविले आहे.
योजनेंतर्गत शहरी गरीब लाभार्थ्यांना उपजीविका आधारित सुविधा पुरविण्यासाठी कंत्राटी पद्धतीने दोन शहर अभियान व्यवस्थापकांची नियुक्ती केली होती. भिवंडी महापालिकेत कैलास पाटील व संजय ठाकरे यांनी ही जबाबदारी सांभाळली. मात्र त्यांचे कामकाज समाधानकारक नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. दोन्ही व्यवस्थापक वारंवार गैरहजर राहणे, त्यांच्याकडे सोपविण्यात आलेली कामे वेळेत पूर्ण न करणे आणि विशेषतः फेरीवाला सर्वेक्षणासारखी महत्त्वाची जबाबदारी वर्षानुवर्षे अपूर्ण ठेवणे, अशा अनेक त्रुटी त्यांच्या कामकाजात दिसून आल्या. तसेच बायोमेट्रिक फेरीवाला सर्वेक्षण, ना-फेरीवाला धोरण अंमलबजावणी, बेघर निवारा केंद्रासाठी देयके अदा करणे यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये त्यांनी टाळाटाळ केल्याचेही स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर आयुक्त सागर यांनी पाटील व ठाकरे यांना कार्यमुक्त करून त्यांच्या जागी दोन नवीन व्यवस्थापकांची नियुक्ती करावी, असे आदेश दिले आहेत. यामुळे एनयूएलएमअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com