प्रभाग रचनेवरील सुनावणी पूर्ण

प्रभाग रचनेवरील सुनावणी पूर्ण

Published on

भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवरील सुनावणी बुधवारी (ता. १७) पार पडली. या प्रभागरचनेवर सुमारे ४६ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. सुनावणी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आज सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. आता या सुनावणीचा अहवाल ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून तो निवडणूक आयोगाकडे सादर केला जाईल व ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभागरचनेला मान्यता दिली जाईल.

बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून महापालिका मुख्यालयात प्रारूप प्रभागरचनेवर सुनावणी सुरू झाली. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे या सुनावणी अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. ४६ पैकी ४० हरकती एकाच स्वरूपाच्या होत्या. त्यात प्रामुख्याने काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या हरकतींचा समावेश होता. त्यामुळे त्या सर्वांची एकत्रित सुनावणी घेण्यात आली. या सर्वांनी शहराची लोकसंख्या वाढल्याने प्रभागांची संख्या, तसेच नगरसेवकांची संख्या वाढविण्यात यावी, असा मुद्दा सुनावणी अधिकाऱ्यांसमोर मांडला. नोंदविण्यात आलेल्या हरकतींची योग्य दखल घेण्यात आली नाही, तर नागरिकांच्या हक्कासाठी प्रभागरचनेला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, अशी माहिती काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com