उल्हासनगरात २४ तास पाणीपुरवठा बंद
उल्हासनगर, ता. १७ (वार्ताहर) : एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रावर गुरुत्ववाहिन्यांच्या उन्नतीकरण आणि तातडीच्या दुरुस्तीची कामे सुरू होत असल्याने उल्हासनगरचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. १८) मध्यरात्रीपासून शुक्रवारी (ता. १९) मध्यरात्रीपर्यंत तब्बल २४ तास बंद राहणार आहे. त्यानंतर शनिवारी (ता. २०) कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. महापालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवारी रात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. एमआयडीसीने जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय (एचएसआर) येथे गुरुत्ववाहिनी क्रमांक १, २ व ३ वर उन्नतीकरण व दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने ही अडचण निर्माण होत आहे. या कामामुळे महापालिकेच्या कॅम्प क्रमांक ४, ५ तसेच कॅम्प क्रमांक ३ च्या काही भागांत पाणीपुरवठा बंद राहील. शनिवारी पाणीपुरवठा सुरू होईल; मात्र तो कमी दाबाने आणि मर्यादित प्रमाणात असेल. पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना आगाऊ इशारा देत स्पष्ट केले की, या काळात पाण्याचा गैरवापर टाळावा, साठवण करून ठेवा आणि उपलब्ध पाणी जपून वापरावे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या दुरुस्ती व उन्नतीकरणामुळे भविष्यात शहराला अधिक सक्षम व सुरळीत पाणीपुरवठा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी तात्पुरती गैरसोय सहन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.