विठ्ठलवाडीत आठवडाभर पाणीबाणी
विठ्ठलवाडीत आठवडाभर पाणीबाणी
तात्पुरत्या उपाययोजनेनंतर पुरवठा पूर्ववत
कल्याण, ता. १८ (बातमीदार) : विठ्ठलवाडी येथील टाटा कॉलनी, जय अंबे कॉलनी, महेश कॉलनी व आसपासच्या अन्य चाळ परिसरात जलवाहिन्या फुटल्याने आठवडाभर नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागले. फुटलेल्या जलवाहिन्यांना वेल्डिंग करून, तसेच नवीन वाहिनी टाकून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करण्यात आल्या आहेत; मात्र आम्हाला अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असून हे पाणी पिण्यायोग्य नाहीत, अशा तक्रारी परिसरातील रहिवाशी करीत आहेत.
विठ्ठलवाडीतील बहुतांश परिसर हा बैठ्या चाळींचा असून या चाळींतील घरांना तसेच इमारतींना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या या गटारे तसेच नाल्यावरून गेल्या आहेत. यातील जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांचा संबंध सांडपाण्याशी येत असल्याने नागरिकांना सांडपाणी मिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. असे येथील नागरिकांच्या तक्रारी असून हेच पाणी आम्ही प्यायचे का, असा सवाल पाणीपुरवठा विभागाला केला जात आहे. तसेच जलवाहिन्य अन्य ठिकाणाहून टाकण्याची मागणी केली जात आहे.
दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे काहींनी घरात जलशुद्धीकरण यंत्र बसवले असून काहींना विकतचे पाणी घ्यावे लागते; मात्र पाण्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करणे सर्वांनाच परवडणारे नाही. अनेकांना नळाद्वारे येणाऱ्या दूषित पाण्यावर अवलंबून रहावे लागते. हेच दूषित पाणी प्यायल्याने कॉलरा, कावीळ, विषमज्वर, आमांश, क्रिप्टोस्पोरिडिओसिस, नॉरोव्हायरस, रोटाव्हायरस, लेप्टोस्पायरोसिस असे पाण्यामार्फत होणारे गंभीर आजार जडण्याची शक्यता अधिक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.