तलाव भरले तरी मुंबईचे अनेक भाग तहानलेले
तलाव भरले पण मुंबईत पाणीटंचाई
कमी दाबाने पुरवठा, नागरिकांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव भरले तरी मुंबईचे अनेक भाग अजूनही तहानलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. गोराई भागात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे स्थानिक माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी सांगितले. तर कांदिवली भागातही कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत; मात्र या तक्रारींचे निवारण पालिकेचे जलअभियंता विभाग करीत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.
मुंबईच्या शहर आणि उपनगरातील झोपडपट्ट्यांमध्ये कमी आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची समस्या अधिक तीव्र झाली आहे. पाणीपुरवठ्याचे वितरण असमान आणि अपुरे असल्याने ही समस्या अधिक भेडसावत आहे. तसेच दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. मुंबईचे तलाव भरले तरी कमी दाबाने पाणीपुरवठा का होतो, असा सवाल नागरिक करीत आहेत.
................
हे भाग तहानलेले
जुहू, गोराई, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, खार, सांताक्रूझ, वांद्रे पश्चिम, वांद्रे पूर्व, एलआयसी कॉलनी बोरिवली, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा या भागांत पाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.