एकाच उत्पन्नाच्या दाखल्यावर पदवीचे होणार पूर्ण शिक्षण ;
एकाच उत्पन्नाच्या दाखल्यावर पदवीचे शिक्षण
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या अडचणी होणार कमी
मुंबई, ता. १८ : प्रवेशावेळी एकदाच उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक, पारंपरिक अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. यामुळे शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्ती आदींसाठी वारंवार दाखला द्यावा लागणार नसल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेत आज मंत्रालयात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिक दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग आणि इतर सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक संस्थांना आणि विद्यार्थ्यांना वेळेत मिळावी, यासाठी कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी नुकतीच आढावा बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी एकदा विद्यार्थ्यांकडून माहिती अपलोड केल्यानंतर नव्याने माहिती घेण्याची आवश्यकता राहणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना पाटील यांनी केली.
--
असे होतील फायदे
- शिष्यवृत्ती अर्जाच्या छाननीसाठी वेळेची बचत होईल.
- प्रवेशित विद्यार्थ्यांचा अचूक डेटाही उपलब्ध होईल.
- विद्यापीठांनीसुद्धा कागदपत्रे पुन्हा तपासावी लागणार नाही.
- विद्यार्थ्यांनाही वारंवार तीच माहिती द्यावी लागणार नाही.
- विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यातील टप्पे कमी होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.