बागायतदार दुहेरी संकटात
बागायतदार दुहेरी संकटात
बोर्डी, ता.२० (बातमीदार) : प्रधानमंत्री हंगामी फळपिक विमा योजने अंतर्गत बागायतदारांनी विमा सुरक्षा कवच मिळवण्यासाठी केलेले अर्जात कागदपत्राच्या त्रुटी दाखवून पुन्हा सेवा केंद्राकडे पाठविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दुहेरी संकट कोसळले आहे. एकीकडे पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव व फळांची घटलेली आवक अशा संकटात असताना एक जुलै ते ३० सप्टेंबर या काळातील विमा मिळवण्यासाठी केलेला वाया जाणार की काय अशा भीतीने शेतकरी चिंतीत झाला आहे.
डहाणू व तलासरी तालुक्यातील जवळ जवळ सर्व पिक विम्याचे अर्ज त्रुटी काढून सर्व महा ई-सेवा केंद्राकडे परत करण्यात आले आहेत.पालघर जिल्ह्यात चिकू फळ पिक विमा सुरक्षा कवच देण्याचे काम बजाज अलायन्स कंपनीला देण्यात आले आहे याकरिता ३० जूनपूर्वी पालघर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी हेक्टरी तीन हजार पाचशे रुपये विमा हप्ता भरून पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले होते.
परंतु शुक्रवार (ता.१९) अचानक डहाणू व तलासरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्जामध्ये त्रुटी असल्याचे दाखवून ई सेवा केंद्राकडे परत पाठवण्यात आले आहेत याबाबत विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता योग्य ती माहिती संध्याकाळी ८ वाजेपर्यंत किवा उद्या सकाळपर्यंत शेतकऱ्यापर्यंत देवू कळविण्यात येईल असे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे परंतु अशाप्रकारे विमा कंपनीने त्रुटी काढून अर्ज बाद करण्याचा प्रकार घडल्यामुळे बागायतदार दुहेरी संकटात सापडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.