अकरावी ऑनलाइन प्रवेशाची अखेरची फेरी
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची अखेरची फेरी
सोमवापासून अर्ज आणि २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश
मुंबई, ता. २० : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मागील तीन महिन्यांपासून सुरू झालेली अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. २२ सप्टेंबरपासून या प्रवेशाची अखेरची विशेष फेरी राबवली जाणार असून, याचे प्रवेश २५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर कोणतीही प्रवेश फेरी आयोजित केली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अंतिम प्रवेश फेरीत प्रवेश घेण्याचे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.
अकरावीचे प्रवेशासाठी यंदा एकूण १० फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात आली. यात मुख्य केंद्रीय प्रवेशाच्या कॅप फेऱ्या चार, ओपन टू ऑलच्या दोन आणि २२ सप्टेंबरच्या अंतिम विशेष फेरीसह एकूण चार विशेष फेऱ्या आयोजित करण्यात आल्या. सुरुवातीच्या मुख्य कॅप फेऱ्यांमध्ये प्रवेशाची संख्या खूप कमी होती, तर ओपन टू ऑल आणि विशेष फेऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रवेशाची नोंद झाली. या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २१ लाख ५९ हजार २३२ इतक्या प्रवेशाच्या जागा होत्या. त्यासाठी १४ लाख ८५ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी आतापर्यंत १३ लाख ४३ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी विविध प्रवेश फेऱ्यांमध्ये प्रवेश घेतले आहेत. तर अद्याप आठ लाख १५ हजार २६३ जागा प्रवेशापासून रिक्त राहिल्या आहेत.
अंतिम फेरीचे वेळापत्रक
२२ सप्टेंबर : नव्या महाविद्यालयांनी नोंदणी करणे, कोट्याच्या जागा समर्पित करणे,
२२ ते २३ सप्टेंबर : प्रवेशासाठी नवीन नोंदणी, एटीकेटी, दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोंदणीतील भाग-१, भाग-२ दुरुस्ती, प्राधान्यक्रम भरणे
२४ ते २५ सप्टेंबर : प्रवेश निश्चित झालेल्या महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घेणे, कॅप आणि कोटाअंतर्गत प्रवेशही पूर्ण करणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.