जिल्हाधिकारी थेट दुर्गम वाडीत; कर्जत-नांदगाव एसटी फेरी वाढणार
जिल्हाधिकारी थेट दुर्गम वाडीत
कर्जत-नांदगाव एसटी फेरी वाढणार
कर्जत, ता. २१ (बातमीदार) ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या निमित्ताने रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कर्जत तालुक्यातील ताडवाडी आणि चाफेवाडी या आदिवासीवाड्यांना गुरुवारी (ता. १८) भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. पाणी, रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांवर चर्चा केली. ताडवाडीत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना वनपट्ट्यांवर बांबूलागवडीचा सल्ला दिला. महिलांच्या बचत गटांना अनुदान देण्यासाठी प्रशासन कोणतीही अडचण करणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
चाफेवाडीत ग्रामस्थांनी एसटी बस फेऱ्यांची कमतरता हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यासमोर मांडला. दिवसातून फक्त एकच फेरी असल्याने विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला जाण्यास आणि नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी अडचण येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ जिल्हा वाहतूक नियंत्रकांना सोमवार (ता. २२) पासून नांदगाव-खांडस मार्गावर तीन अतिरिक्त फेऱ्या करण्याचे आदेश दिले. यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला.
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान हा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या कार्याला आदरांजली म्हणून या अभियानाला धरती आबा नाव देण्यात आले आहे. आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जिल्हाधिकारी स्वतः वाड्यांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत असल्याने ग्रामस्थ समाधानी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.