राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी

राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी

Published on

इयत्ता ११वी ऑनलाइन प्रवेशाची अंतिम फेरी सुरू
पालघर, ता. २१ (बातमीदार) : राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी इयत्ता ११ वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश मिळालेला नाही, त्यांच्यासाठी ही एक शेवटची संधी आहे. राज्यातील २१ लाखांहून अधिक प्रवेश क्षमतेपैकी आतापर्यंत १३ लाखांहून अधिक जागा भरल्या आहेत, तर उर्वरित जागांसाठी ही फेरी आयोजित करण्यात आली आहे.
या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून ते २४ सप्टेंबर रोजी दुपारी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील. या कालावधीत अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशही होणार आहेत. विशेष म्हणजे, विद्यार्थी २५ सप्टेंबरपर्यंत थेट महाविद्यालयात जाऊनही आपला प्रवेश निश्चित करू शकतात.
पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि माहितीसह वेळेत प्रवेश निश्चित करावा अन्यथा ही संधी पुन्हा मिळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com