गाव-पाड्यांचे रस्ते तत्काळ करण्यासाठी निवेदन

गाव-पाड्यांचे रस्ते तत्काळ करण्यासाठी निवेदन

Published on

जव्हार, ता. २३ (बातमीदार) : स्वातंत्र्याची ७८ वर्षे उलटूनदेखील जव्हार तालुक्यातील गाव-पाडे, वाड्या-वस्त्यांवर जाण्यासाठी रस्ते नाहीत. नुकतेच चांभारशेत येथील नारनोली पाड्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने महेंद्र जाधव यांचा मृतदेह डोली करून लाकडाला बांधून दोन किमी चालत नेण्यात आला. या पाड्यावर तातडीने रस्ता करावा, अशा आशयाचे निवेदन सोमवारी (ता. २२) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने दिले.

आदिवासी गाव-पाडे, वाड्या-वस्त्यांना मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना ऑगस्ट २०२३ मध्ये तत्कालीन मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे; मात्र या योजनेतून जव्हार तालुक्यासह पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागात एकही काम मंजूर झाले नाही. तसेच जव्हार तालुक्यात काही ग्रामपंचायतींचेच ठक्कर बाप्पा आदिवासी योजनेचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता संपूर्ण तालुक्यात या योजनेतून गाव-पाड्यांवर जाणारे रस्ते करावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने करीत निवेदन दिले आहे. या वेळी पालघर जिल्हाप्रमुख अनुप पाटील, नीलेश गंधे, प्रफुल्ल पवार, विजय अंभिरे, श्रावण खरपडे, अरशद कोतवाल, महेश चौधरी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com